दिनांक 18/7/2020 रोजी दुधखेडा धरणावर जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री शिंदे साहेब व दुधखेडा धरणाचे शाखा अभियंता श्री एम बी पाटील साहेब यांनी मुख्य धरणाचे गेट दुरुस्तीचे काम पाहीले व आदरणीय ताईसो हेमलता शितोळे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा नंदुरबार व प, स, सदस्यां सौ ललीताबाई राजेंद्र बाविस्कर व सामाजिक कार्यकर्ते श्री राजेन्द्र बाविस्कर व बी एस पी फांऊडेशनचे टिम यांनी उपविभागीय अधिकारी व शाखा अभियंता यांना धरणाचे मुख्य गेट पासून ते पिप्रि फाट्या पर्यतं पाट चारीची पाहाणी केली असता पाटाचे रूंदी कमी असल्यामुळे पुढील भागात पाणी जात नाही तसेच पाटचारी मध्ये मोठ्या प्रमाणात गाळ जमा झालेला असुन डिप कट पाटाचे रूंदी कमी असल्यामुळे पुर्ण क्षमतेने पाट चारी मध्ये पाणी येत नाही हे उपविभागीय अधिकारी शाख अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिले व रंबबी हंगामात शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून घ्यावे असी प स सदस्यां व गावातील शेतकऱ्यांनी मागणी केली तसेच उपविभागीय अधिकारी श्री शिंदे साहेब व शाखा अभियंता श्री एम बी पाटील साहेब यांनी आश्र्वासन दिले कि पाट चारी दुरूस्ती करून शेतकऱ्यांना पाणी सोडण्यास आम्ही बांधील आहोत तसेच हेमलताताई शितोळे यांनी साहेबांना सांगितले की जल संपदा विभागाकडे ईमेल द्वारे धरणाचे कामा संदर्भात मंत्रालयात व अधिक्षक अभियंता तसेच कार्यकारी अभियंता जल संपदा विभागाकडे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीच्या हेमलता शितोळे तसेच प स सदस्यां सौ ललीताबाई राजेंद्र बाविस्कर यांनी आपल्या स्तरावर कागदोपत्री पाठ पुरावा केला आहे असे हेमलता ताईनीं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले तरी गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
--------------------------------------
अखेर मुहूर्त सापडला
अनेक वर्षांपासून दुधखेडा धरणाचे मुख्य दरवाजातून हजारो लिटर वाया जाणाऱ्या पाण्यास रोखण्यात प.स.सदस्य सौ ललिता बाविस्कर पती श्री आ.राजुदादा बाविस्कर यांच्या अथक प्रयत्नातून पाटबंधारे विभागास यश आले.
नंदुरबार जिल्ह्यातील प.स समिती असलोद गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव सदस्य सौ ललिताबाई बाविस्कर पती राजेंद्र बाविस्कर यांचा प्रशासकीय कामातील गाढा अभ्यास असलोद गावाच्या कामी आला,याला जोड म्हणून शहादा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सौ हेमलताताई शितोळे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
दुधखेडा धरणातील मुख्य दरवाज्याच्या नादुरुस्त वाल्वमधून अनेक वर्ष्यापासून हजारो लिटर पाणी वाया जात होते परंतू अनेकवेळा लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा केला व तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी होऊन प्रश्न कायमस्वरूपी तसाच राहिला,नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनात दुधखेडा धरणातील प्रलंबित प्रश्नसुध्दा होता,आठ दिवस चाललेल्या अखंड कामाचे काल यशस्वी समारोप झाला,यात प्रामुख्याने मंत्री आ.जयंतराव पाटील,सौ हेमलताताई शितोळे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.